Maharashtra Political Crisis: सरकारला सत्तेत राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही - जयंत पाटील
पुढारी ऑनलाईन: सर्वोच्च न्यायालयाने आज सत्तासंघर्षावर निर्णय दिला. या निर्णयामुळे राज्यातील शिंदे सरकार वाचले असले तरी, त्यांना सत्तेत राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्पष्ट केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडेलवरून जयंत पाटील यांनी ट्विट करत, सत्तासंघर्षावरील सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर मत व्यक्त केले आहे.
जयंत पाटील यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, राज्यपालांनी घेतलेले सर्व निर्णय कसे चुकीचे आहेत हे सुप्रिम कोर्टाने सांगितले आहे. भरत गोगावले यांचा व्हिप सुप्रीम कोर्टाने अमान्य केल्याने विधानसभेत घडलेली सर्वच कृती ही अवैध ठरणार आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांना सुप्रीम कोर्टाने नमूद केलेल्या मुद्यांच्या चौकटीत राहूनच निर्णय घ्यावा लागेल. यामध्ये विधानसभा अध्यक्ष वेळकाढूपणाचे करू शकणार नाहीत, असे देखील ते म्हणाले.
राज्यातील सत्तासंघर्षावर आज सुप्रिम कोर्टाने दिलेल्या निर्णयानंतर शिंदे सरकार जरी वाचलं तरी त्यांना सत्तेत राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा. @Jayant_R_Patil जयंतराव पाटील यांनी माध्यमांसमोर व्यक्त केले. राज्यपालांनी घेतलेले…
— NCP (@NCPspeaks) May 11, 2023
पण हे सरकार अवैध आणि घटनाबाह्यच…
शिंदे सरकार वाचले हा सत्तेभोवतीचा क्षणिक आनंद ठरू शकतो. पण हे सरकार अवैध आणि घटनाबाह्यच आहे. पण उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला नसता, तर मविआला पुन्हा सत्तेत बसण्याची संधी मिळाली असती, हे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले आहे, यावरूनच सुप्रीम कोर्टाच्या मनात काय होते हे स्पष्ट होते, असेही जयंत पाटील हे ट्विटमध्ये म्हणाले.
मुख्यमंत्र्यांनी काय करावे, हे सांगण्याचा विरोधी पक्षाला अधिकार नाही
कोर्टाच्या आजच्या निकालानंतर एकनाथ शिंदे यांच्याकडून नैतिकतेची अपेक्षा करणेच अन्यायकारक ठरेल. सरकार स्थापन केले त्यावेळी त्यांच्याकडे कोणतीही नैतिकता नव्हती. त्यामुळे त्यांनी नैतिकतेबद्दल बोलणे योग्य वाटत नाही. हे सरकार टिकवणे आणि मुख्यमंत्री म्हणून राहणे यालाच त्यांची प्राथमिकता असेल, तर ते राजीनामा देणार नाहीत. परंतु मुख्यमंत्र्यांनी काय करावे, हे सांगण्याचा विरोधी पक्षाला अधिकार नाही असे ही त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
हेही वाचा:
- महाविकास आघाडीतील अनेक आमदार संपर्कात; निकालानंतर शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांचा दावा
- न्यायालयाच्या निकालाबाबत आ. बाळासाहेब थोरात म्हणतात, खरंतर एकनाथ शिंदे यांनी…
- Maharashtra political crisis : राजीनामा द्यायला आल्यावर मी काय नको म्हणू का? सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर भगतसिंह कोश्यारींची प्रतिक्रिया