Jitendra Awhad Tweet : ‘हीच खरी लोकशाही आहे…’ राजीनाम्यानंतर जितेंद्र आव्हाडांचे सुचक ट्वीट | पुढारी

Jitendra Awhad Tweet : 'हीच खरी लोकशाही आहे...' राजीनाम्यानंतर जितेंद्र आव्हाडांचे सुचक ट्वीट

पुढारी ऑनलाईन डेस्क : मी राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होत आहे, अशी घाेषणा शरद पवार मंगळवारी केली. या घाेषणेनंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांनी “साहेब राजीनामा मागे घ्या” असं भावनिक आवाहन केले आहे. जितेंद्र आव्हाड यांनीही, ‘साहेब तुम्हाला असं महाराष्ट्रातील तुमच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांना अनाथ करून जाता येणार नाही. तुम्हांला राजीनामा परत घ्यावाच लागेल.’ असं भावनिक ट्विट केलं होत. आज (दि.३) आव्हाडांनी  राष्ट्रीय सरचिटणीसपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी ‘खरी लोकशाही’ म्हणतं एक सुचक ट्विट केलं आहे. (Jitendra Awhad Tweet)

Jitendra Awhad Tweet :लोकशाही मध्ये जनतेचा कौल…

जितेंद्र आव्हाड यांनी शरद पवार यांना आपल्या ट्विटमध्ये टॅग करत म्हटलं आहे की,” आदरणीय शरद पवार साहेब नेहमी म्हणतात की,”लोकशाहीमध्ये जनतेचा कौल नेहमी मान्य करायचा असतो; मग तो आपल्या स्वत:च्या मर्जीविरुद्ध का असेना. हीच खरी लोकशाही आहे..!” अस असताना आता खुद्द पवार साहेबांनीच त्यांच्या या विचारांशी फारकत घेत काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.लोकशाहीत विश्वास ठेवणारे पवार साहेब असा निर्णय घेवूच कसा शकतात. हा निर्णय घेताना त्यांनी आम्हाला विश्वासात का नाही घेतलं..? राज्यात आणि देशात सध्या ज्या प्रकारच वातावरण आहे त्यात आम्ही आदरणीय पवार साहेबांच्या शिवाय कसे लढू शकतो. आम्हाला त्यांची गरज आहे. म्हणूनच जितेंद्र आव्हाड  पवार साहेबांनी घेतलेल्या धक्कादायक निर्णयाच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माझ्या राष्ट्रीय सरचिटणीस पदाचा राजीनामा देत आहे. माझ्यासहित ठाण्यातील माझ्या सर्व पदाधिकाऱ्यांनी देखील आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत.

हेही वाचा 

Back to top button