पुढारी ऑनलाईन डेस्क : पक्ष नाही जनता ठरवते कोणाला मुख्यमंत्री करायचे असा टोला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राष्ट्रवादीला लगावला. नाना पटोले यांनी भाजप आणि राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे. महाराष्ट्रात सध्या सुरू असलेला राजकीय वाद आणि मुख्यमंत्र्यांबाबत सुरू असलेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर त्यांचे हे वक्तव्य समोर आले आहे. (Nana Patole)
मुंबईतील बीकेसी मैदानावर आज वज्रमूठ सभा आयोजित केली आहे. या सभेपूर्वी नाना पटोलेंनी (Nana Patole) प्रसारमाध्यमांशी साधलेल्या संवादात भाजपवर टीका केली. शेतकऱ्यांविषयीच्या योजना आणि मदतीबाबत त्यांनी सत्ताधारी पक्षाला धारेवर धरलं. यावेळी ते म्हणाले की, सरकारने पंचनामा न करता शेतकऱ्यांना मदत करावी. शेतकऱ्यांना सन्मान योजनेतून तुटपुंजी मदत दिली जात आहे. खतांचे भाव वाढवले, डिझेलचे दरदेखील वाढवले आहेत.
यावेळी राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होणार याबाबतच्या चर्चांवर देखील पटोलेंनी टोलेबाजी केली. ते म्हणाले की, प्रत्येकाला दिवसा स्वप्न पाहण्याचा अधिकार आहे. मुख्यमंत्री कोण होणार हे जनता ठरवेल अशी प्रतिक्रिया पटोले यांनी दिली.
हेही वाचा