पुढारी ऑनलाईन डेस्क : छत्रपती संभाजीनगरमधील दंगे सरकार पुरस्कृत आहेत. असे दंगे मुंबईमध्येही होत आहेत आणि होतील. सरकार घाबरले आहे म्हणून ते हिंदू-मुस्लिम असा वाद निर्माण करुन राजकारण करत आहेत. देशभरात असे दंगे करुन शांतता भंग करण्याची त्यांची ईच्छा आहे. मात्र, असे कितीही प्रयत्न केले तरी त्यांना हे शक्य होणार नाही. (Sanjay Raut) तसेच छत्रपती संभाजीनगरमध्ये आमची सभा होणार, असा विश्वास खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.