मुंबई : विरार रेल्वे स्थानक येथे रेल्वेच्या धडकेत एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू
मुंबई; पुढारी वृत्तसेवा : विरार रेल्वे स्थानकावर रेल्वे रुळ ओलांडताना रेल्वेची जोरदार धडक बसल्याने एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये एक पुरुष एक महिला व तीन महिन्याचा बाळाचा समावेश आहे.
रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे रुळ ओलांडताना वेगात येणाऱ्या ‘मेल’ने तिघांना जोरदार धडक दिली. यामध्ये पुरूष व महिलेसह तीन महिन्याच्या बाळाचा जागीच मृत्यू झाला आहे. अद्याप मृतांची ओळख पटली नसून वसई रोड लोहमार्ग पोलीस अधिक तपास करत आहेत.
हेही वाचलंत का ?
- चंद्रपूर: भीषण अपघातात डॉक्टर पती पत्नीचा मृत्यू
- पुणे – नगर महामार्गावरील अपघातात आमदाबाद येथील ४ जणांचा मृत्यू
- नाशिक : दिंडोरी तालुक्यात वेगवेगळ्या अपघातांत दोन ठार