मुंबई: मातोश्रीबाहेर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी: उद्धव ठाकरेंनी घेतली भेट | पुढारी

मुंबई: मातोश्रीबाहेर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी: उद्धव ठाकरेंनी घेतली भेट

पुढारी ऑनलाईन डेस्क : केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि पक्षाचे धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह बंडखोरी करणाऱ्या एकनाथ शिंदे गटाला दिले आहे. या निर्णयावर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. दरम्यान, ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी मातोश्रीबाहेर मोठी गर्दी करत जोरदार घोषणाबाजी केली. त्याचबरोबर निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात निदर्शने केली. यावेळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बाहेर येऊन कार्यकर्त्यांची भेट घेतली.

दरम्यान, निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे. पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरुन घोषणा करावी की लोकशाही संपली आहे. देशांत बेबंदशाहीला सुरुवात झाली आहे. पक्ष कोणाचा बरोबर आहे आणि कोणाच्या बरोबर आहे, हे निवडूण आलेल्या लोकप्रतिनिधींच्या संख्येवर ठरवले. तर कोणताही धनाढ्य माणूस पक्ष विकत घेईल, असे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत म्हणाले आहेत.

चोराला राजमान्यता देणे काही जणांना भूषणावह वाटत असेल. मात्र, चोर हा चोरच असतो. ज्यापद्धतीने त्यांनी धनुष्यबाण आणि शिवसेना नाव त्यांनी मिंधे गटाला दिले. त्यावरुन मला वाटतय की, महिन्याभरात मुंबई महापालिकेच्या निवडणुका होतील, असेही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. कागदपत्रे देण्याचा खटाटोप कशाला करायला लावला, असा सवालही उद्धव ठाकरेंनी केला आहे. शिवाय पक्ष संपवण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप ठाकरेंनी यावेळी बोलताना केला.

हेही वाचा 

Back to top button