Sanjay Chouhan : 'पान सिंग तोमर' चित्रपटाचे पटकथा लेखक संजय चौहान यांचे निधन
पुढारी ऑनलाईन डेस्क : पटकथा लेखक संजय चौहान (Sanjay Chouhan) यांचे गुरूवारी दीर्घ आजाराने निधन झाले. ते ६२ वर्षांचे होते. मागील दहा दिवसांपासून त्यांच्यावर मुंबईतील रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमध्ये उपचार सुरू होते. ओशिवरा स्मशानभूमीत आज (दि.१३) दुपारी १२.३० वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी सरिता आणि मुलगी सारा असा परिवार आहे.
संजय चौहान (Sanjay Chouhan) यांचा जन्म भोपाळमध्ये झाला होता. त्यांची आई शिक्षिका आणि वडील भारतीय रेल्वेत नोकरीला होते. सोनी टेलिव्हिजनसाठी 1990 च्या दशकात भंवर हे गुन्हेगारी नाटक लिहिले होते. मुंबईत येण्यापूर्वी त्यांनी दिल्लीत पत्रकार म्हणून कारकीर्दीची सुरुवात केली.
धूप, मैने गांधी को नही मारा, पान सिंग तोमर, आय ॲम कलाम, बीवी और गँगस्टर या सारख्या गाजलेल्या चित्रपटांची पटकथा आणि संवाद लेखन त्यांनी केले होते. तसेच सुधीर मिश्रा यांचा 2003 मधील चित्रपट हजारों ख्वाहिशे ऐसी आणि 2010 मधील राईट या राँग या चित्रपटासाठी त्यांनी संवाद लेखन केले होते.
2012 मध्ये पान सिंग तोमर या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट फीचर चित्रपटाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला होता. तर दिवंगत अभिनेते इरफान खानला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला होता. आय ॲम कलाम या चित्रपटाला विविध आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये अनेक पुरस्कार मिळाले. या चित्रपटातील बालकलाकार हर्ष महापौर यांना सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला होता.
Sanjay Chouhan, writer of Paan Singh Tomar, passes away at 62
Read @ANI Story | https://t.co/IxBX7xZhha#SanjayChouhan #PaanSinghTomar #Bollywood pic.twitter.com/hJ2T3lLBkw
— ANI Digital (@ani_digital) January 13, 2023
हेही वाचलंत का ?