एअरबस प्रकल्प गुजरातमध्ये, अरे आमचा महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवणार आहात? : जयंत पाटील
मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : गुजरात निवडणुकांच्या अनुषंगाने सर्व प्रकल्प गुजरातला नेले जात आहेत आणि मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री मात्र बघ्याच्या भूमिकेत आहेत. आमचा महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवणार आहात? असा संतप्त सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी शिंदे सरकारला केला आहे.
वेदांता फोक्सकॉन प्रकल्पापाठोपाठ आता नागपुरात येणारा एअरबस प्रकल्पदेखील महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेला आहे. यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी संतप्त प्रतिक्रिया ट्वीटच्या माध्यमातून व्यक्त केली आहे. वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पानंतर नागपूरमध्ये होणारा २२ हजार कोटींचा टाटा एअरबस प्रकल्प आज गुजरातला गेला. एकामागून एक मोठे प्रकल्प गुजरातला जात आहेत. महाराष्ट्रातील सध्याचे सरकार दिल्लीसमोर किती हतबल झाले आहे हे यातून स्पष्ट होते असा थेट आरोपही जयंत पाटील यांनी केला आहे.
महाराष्ट्रातील सत्तांतर राज्याला वेठीस धरण्यासाठी झाले आहे का? असा प्रश्न सध्या पडत आहे असेही जयंत पाटील म्हणाले.
हेही वाचा :
- चर्चच्या नन्स आणि पाद्रीदेखील पॉर्न पाहतात, सर्वोच्च ख्रिस्ती धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांनी दिली कबुली
- तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या नवीन किमती केल्या जाहीर; जाणून घ्या आजचे दर
- Elon Musk : ट्विटरचे सीईओ पराग अगरवालसह अन्य अधिका-यांना मस्क यांनी काढले, ‘पक्षी मुक्त झाला’, ट्विटरचा ताबा घेतल्यानंतर एलॉन मस्क यांचे ट्विट