मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : संभाजीराजेंचे मुख्यमंत्र्यांना प्रत्त्युत्तर : मुख्यमंत्र्यांनी पाठवलेल्या पत्रावर उत्तर देताना छत्रपती संभाजी राजेंनी आता आंदोलनाची भूमिका घेतली आहे. शासकीय अधिकाऱ्यांनी लिहिलेल्या पत्रावर केवळ मुख्यमंत्री व मंत्र्यांनी सही करण्याची भूमिका केली आहे. एवढी मूक आंदोलन केल्यानंतर मराठा समाजाला काही देण्याची सरकारची इच्छाच नसेल, तर मी कंटाळलो आहे, असेही ते म्हणाले.
मराठा समाज आणि समन्वयक यांना वेठीस धरण्याऐवजी समाजाने परवानगी दिल्यास मी एकटाच आझाद मैदानात आंदोलनास बसायला तयार आहे, असेही संभाजीराजेंनी सांगितले.
तिसरी लाट येणार असताना हजारोंच्या संख्येने मूक आंदोलन केल्यास आमच्यावर तिसऱ्या लाटेची पावती फाडली जाईल, असेही संभाजी राजे म्हणाले.
अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून १८८५ कोटींचा निधी मागील सरकारनेच वाटप केला आहे. आताच्या सरकारने केवळ साडेबारा कोंटीचे वाटप केले आहे. राज्य सरकारने अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या निधीमध्ये वाढ करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
हेही वाचलं का ?