मुंबई-अहमदाबाद महामार्गावर कंटेनरला अपघात: ५ तास वाहतूक ठप्प
खानिवडे; पुढारी वृत्तसेवा: मुंबई- अहमदाबाद महामार्गावर अपघातांची मालिका कायम सुरूच आहे. वसई पूर्वेतील सातीवली फाटा उड्डाण पुलावर कंटेनर पुलाच्या कठड्याला धडकला. हा अपघात आज (दि.१४) सकाळी घडला. यामुळे मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
या अपघातामुळे वाहतूक खोळंबल्याने मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांच्या सुमारे ५ किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी पुलाखालून वाहतूक सुरू करून कंटेनर हटवण्याचे काम सुरू केले. या अपघात कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाल्याचे वृत्त नाही. सुमारे ४ ते ५ तास वाहतूक ठप्प झाल्याने वाहन चालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. अपघातग्रस्त कंटेनरमध्ये रसायन भरलेले बॅरल होते.
हेही वाचलंत का?