विधिमंडळात विरोधी पक्षनेते अजित पवारांना बोलताना अध्यक्षांनी थांबवले; जयंत पाटलांनी विचारला जाब | पुढारी

विधिमंडळात विरोधी पक्षनेते अजित पवारांना बोलताना अध्यक्षांनी थांबवले; जयंत पाटलांनी विचारला जाब

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : विरोधी पक्षनेते अजित पवार विधिमंडळात मुख्यमंत्र्यांच्या उत्तरावर बोलत असताना विधानसभा अध्यक्षांनी त्यांना थांबवले. यावरून राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील आक्रमक झाले. “आपण सत्तारूढ पक्षाची बाजू घेऊन बोलत असल्याचा भास आम्हाला होत आहे”, अशा शब्दात विधानसभा अध्यक्षांना त्यांनी जाब विचारला.

विधानसभेत आज पुरवणी मागणीवर चर्चा होत असताना सभागृहात विभागाचे मंत्रीच उपस्थित नव्हते. या विषयाकडे जयंत पाटील यांनी विधानसभा अध्यक्षांचे लक्ष वेधले. मंत्री नाहीत तर उत्तरे कोण देणार? उत्तरे द्यायची नसतील तर खातेवाटप कशासाठी केले? ४० दिवस विस्तार थांबवला; आता उत्तराला टाळाटाळ करत आहेत, असा आरोपही पाटील यांनी यावेळी केला.

हेही वाचा :

Back to top button