आजही तुमच्यासाठी मातोश्रीचे दरवाजे उघडे : बंडखोर आमदारांना आदित्य ठाकरे यांचे पुन्हा आवाहन | पुढारी

आजही तुमच्यासाठी मातोश्रीचे दरवाजे उघडे : बंडखोर आमदारांना आदित्य ठाकरे यांचे पुन्हा आवाहन

पुढारी ऑनलाईन डेस्क : ज्यांनी दगा दिला त्यांनी निवडणूकीला सामोरे या, जनता जो निर्णय देईल तो आम्हाला मान्य असेल; पण ज्यांना  परत यायचे आहे त्यांच्यासाठी आजही मातोश्रीचे दरवाजे उघडे आहेत, असे आवाहन शिवसेनेचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा बंडखोर आमदारांना केले. मुंबईत दहिसरमध्ये निष्ठा यात्रेदरम्यान ते बोलत होते.

 यावेळी आदित्‍य ठाकरे म्हणाले की, जे आमदार पळून गेले ते जाऊदेत; पण आजही शिवसैनिक हा शिवसेनेसोबतच आहे. निघुन गेलेल्यांमध्ये दोन गट आहेत. काही राक्षसी महत्वाकांक्षीने गेले आहेत तर काहींना पळवून नेले आहे, हे लवकरच समोर येईल. जे दबावाने गेले आहेत त्यांच्या मनामध्ये थोडीशी लाज असेल, तर पुन्हा आमदार होण्यासाठी राजीनामा देऊन निवडणूकीला सामोरे या. जनता जो निर्णय देईल तो आम्हाला मान्य असेल. पक्षप्रमुख आजारी असताना आमदार सोडून गेले याचं सर्वात जास्त दु:ख आहे. आम्ही समाजकारण करत आलो, त्यामुळेच राजकारणात करण्यात कमी पडलो, अशी खंतही आदित्य ठाकरे यांनी व्‍यक्‍त केली.

हेही वाचलंत का?

Back to top button