बंडखोर आमदारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसला : संजय राऊत | पुढारी

बंडखोर आमदारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसला : संजय राऊत

पुढारी ऑनलाईन डेस्क : मी बोललो की, बंडखोर आमदारांना राग येतो. ज्या बंडखोर आमदारांनी बाळासाहेब ठाकरेंनी पुत्र्याप्रमाणे प्रेम दिले, त्याच आमदारांनी वाटतेल ते कारणे देऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसला आहे, अशी टीकाही संजय राऊत यांनी केली .

शिंदे गटाने सर्वोच्च न्यायलयात धाव घेतल्यानंतर महाविकास आघाडी सरकारबाबत सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देणार याकडे सर्वांचे लक्ष्य आहे. माझ्यासारख्या बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसैनिकाला ईडीसारख्या यंत्रणेचा वापर करून त्रास देण्यात येत आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला.

महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर महाराष्ट्राने उद्धव ठाकरे यांच्या रूपाने सुसंस्कृत मुख्यमंत्री अनुभवला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादचे-संभाजीनगर, उस्मानाबादचे-धाराशिव आणि नवी मुंबई विमानतळाचे- दि.बा.पाटील असे नामकरण करण्याचा महात्वाचा निर्णय घेतला आहे. शिवसेनेने अनेक बंड अनुभवले. याही बंडातून शिवसेना नव्यावे उभारी घेईल, असा विश्‍वासही संजय राऊत यावेळी व्‍यक्‍त केला.

हेही वाचलंत का?

Back to top button