Rajya Sabha elections : महाविकास आघाडीचा प्रस्ताव चंद्रकांत पाटलांनी धुडकावला | पुढारी

Rajya Sabha elections : महाविकास आघाडीचा प्रस्ताव चंद्रकांत पाटलांनी धुडकावला

पुढारी ऑनलाईन डेस्क : राज्यसभेची निवडणूक (Rajya Sabha elections) बिनविरोध करण्यासाठी महाविकास आघाडीने भाजपला दिलेला प्रस्ताव भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी धुडकावून लावला आहे. भाजप हा राष्ट्रीय पक्ष असल्याने पक्षासाठी राज्यसभेची जागा महत्त्वाची आहे. त्यामुळे महाविकास आघाडीने तिसरी जागा आमच्यासाठी सोडावी. त्याबदल्यात विधान परिषदेची पाचवी जागा न लढवण्याबाबत विचार करू, असे पाटील यांनी सांगितले.

कोल्‍हापूर : टाकळीवाडीत मंदिराच्या वास्‍तुशांतीत विधवा महिलांना दिला पूजेचा मान

राज्यसभा निवडणूक (Rajya Sabha elections) बिनविरोध करण्याचा प्रस्ताव घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री छगन भुजबळ, शिवसेनेचे नेते खासदार अनिल देसाई, काँग्रेस मंत्री सुनिल केदार यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी चंद्रकांत पाटीलही उपस्थित होते. या भेटीनंतर पाटील यांनी भाजपची भूमिका स्पष्ट केली. त्यामुळे शिवसेना दुसरी जागा लढवण्यावर अडून राहिल्यास ही निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता आहे.

भोंगा प्रकरण : राज ठाकरेंचे पत्र घरोघरी वाटणाऱ्या ८ मनसैनिकांना घेतलं ताब्यात

भाजपकडे ६ सहयोगी अपक्ष आमदारांसह ३० मते अतिरिक्त आहेत. आमचा पक्ष राष्ट्रीय पक्ष असून राज्यसभा आमच्यासाठी महत्त्वाची आहे. त्यामुळे आम्ही विधान परिषदेच्या निवडणुकीत पाचवी जागा लढवणार नाही. प्रदेश भाजपच्या या भूमिकेवर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनीही समाधान व्यक्त केल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

Rajya Sabha elections : तर भाजपला विधानपरिषदेच्या ५ जागा

महाविकास आघाडीने भाजपला ऑफर दिली आहे. भाजपने राज्यसभा निवडणूक बिनविरोध करण्यास मदत केल्यास त्या बदल्यात विधान परिषद निवडणुकीत भाजपला जागा सोडली जाईल. सध्याचे संख्याबळ पाहता भाजपचे चार उमेदवार विधान परिषेदत विजयी होऊ शकतात. तर, महाविकास आघाडीने भाजपला आणखी एक जागा दिल्यास भाजपला ५ जागा मिळू शकतात.

हेही वाचलंत का ? 

Back to top button