शिवलिंग शोधण्यापेक्षा काश्मीर पंडितांना वाचवा; संजय राऊतांचा भाजपला टोला
पुढारी ऑनलाईन : सध्या काश्मीरमधील स्थिती फारच गंभीर आहे. १९९० च्या दशकात होती तीच परिस्थिती आज काश्मीरमध्ये निर्माण झाली आहे. तुम्ही काश्मिरी पंडितांना घरवापसीबद्दल सांगितलं आणि त्यावर हिंदुत्वाच्या नावे मतंही मिळवली होती. पण त्याच्या सुरक्षेचं काय? असा सवाल करत शिवसेना प्रवक्ते आणि खा. संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. शिवलिंग शोधण्यापेक्षा काश्मीर पंडितांना वाचवा, असेही त्यांनी म्हटले आहे.
खा. संजय म्हणाले, काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यानंरही काश्मिरी पंडित, तेथील जनतेच्या स्थितीत कोणताही बदल झालेला नाही. तेथील लोकांच्या जीवनात कोणतीही सुधारणा झालेली नाही. जर इतर पक्षाच्या राजवटीत हे हत्यासत्र झालं असतं तर, भाजपाने काश्मिरी पंडित, हिंहुत्वाच्या नावाने संपूर्ण देशभर गोंधळ घातला असता. पण काश्मीरमध्ये राज्य तुमचे असतानाही काश्मिरी पंडित जीव गमावत हे भयानक आहे, असेही मत राऊत यांनी व्यक्त केले.
Today the same situation has arisen in Kashmir that was in 1990s. You (BJP) talked about return of Kashmiri Pandits to the Valley&fetched votes on the same in the name of Hindutva.There is no improvement in people’s lives despite abrogation of Art 370 in J&K:Sanjay Raut,Shiv Sena pic.twitter.com/tFZf2OmXF3
— ANI (@ANI) June 3, 2022
हेही वाचा :
- भाजप कार्यकर्त्यांना अटकपूर्व जामीन; राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकार्याचा विनयभंग प्रकरण
- मोठी बातमी : हिंदूंच्या हत्यांनंतर काश्मीरमधून पंडितांसह हिंदूंचे स्थलांतर सुरू
- लोणी-मूर्तिजापूर महामार्गावर सतत ५ दिवस रस्ता बांधकामाचा विश्वविक्रम सुरु; ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये होणार नोंद