पवारांनी लोकांना फसवणं ही परंपरा : चंद्रकांत पाटील
पुढारी ऑनलाईन डेस्क : ओबीसी आरक्षणासंदर्भात आज (दि.२५) भाजप पक्षाने मुंबईत मोर्चा काढला आहे. यावेळी माध्यमांशी बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीसोबत शरद पवारांवर निशाणा साधला. ओबीसी आरक्षणासाठी भाजप आक्रमक झाली असून मध्य प्रदेश सरकार ओबीसी आरक्षणसंदर्भात यशस्वी होऊ शकतं. मग महाराष्ट्र का नाही? असा सवाल मोर्चातून मांडला जात आहे.
मध्य प्रदेश सरकार ट्रिपल टेस्ट करतं मग महाराष्ट्र सरकार का करत नाही, यांच्या मनात कुठेतरी खोट आहे, असा आरोप यावेळी आ. चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर केला आहे.
पाटील यावेळी म्हणाले, राज्य सरकारने ओबीसी समाजाला फसवलं आहे. पवारांनी लोकांना फसवणं ही परंपरा असून ओबीसी समाज शरद पवारांवर विश्वास ठेवणार नाही.
हेही नक्की वाचा....