मानवत, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील हटकरवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी मीराबाई बाबासाहेब जोरवर यांची आज (दि.१०) बिनविरोध निवड करण्यात आली. पिठासन अधिकारी म्हणून तहसील कार्यालयातील व्ही. आर. वाघमारे यांनी काम पाहिले.
सरपंचपद रिक्त असल्याने हटकरवाडी ग्रामपंचायत कार्यालयात सरपंचपदासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. सरपंच पदासाठी मीराबाई जोरवर यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड सर्व सदस्यांच्या उपस्थितीत करण्यात आली. यावेळी तलाठी सावंत व ग्रामसेवक स्वामी उपस्थित होते. निवडीनंतर नवनिर्वाचित सरपंच यांचा सत्कार करण्यात आला.
हेही वाचा