परभणी : पूर्णेच्या बंधाऱ्यातून लाखो लिटर पाण्याची गळती

परभणी : पूर्णेच्या बंधाऱ्यातून लाखो लिटर पाण्याची गळती
Published on
Updated on


पूर्णा: शहराला पाणीपुरवठा केल्या जाणाऱ्या पूर्णा नदीवरील रहाटी बंधा-यातून सोडलेल्या पाण्याला नादूरुस्त व फुटक्या बंधा-यामुळे गळती लागली आहे. त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया जात आहे. याकडे परभणी येथील मृद व जलसंधारण खात्याचे संबंधित अधिकाऱ्यांकडून डोळेझाक होत आहे. Parbhani

येथील बंधा-याच्या बकाल अवस्थेची बातमी 'दै पुढारी' च्या दि. ९ फेब्रुवारीच्या अंकात प्रकाशित करण्यात आली होती. त्याची दखल घेत आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे काका मित्रमंडळाचे तालुकाध्यक्ष गणेशराव कदम, तालुका प्रभारी सुभाषराव देसाई व माजी पं. स. सदस्य छगनराव मोरे यांच्यासह ग्रामीण भागातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आमदार गुट्टे यांची भेट घेऊन पूर्णेच्या बंधा-यात रहाटी बंधा-यातून पाणी सोडण्याची मागणी केली होती. Parbhani

आमदार डॉ. गुट्टे यांनी जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी आणि नगरपरिषदेचे प्रशासक यांच्याशी संपर्क साधला होता. त्यानंतर रहाटी बंधा-यातून पाणी सोडण्यात आले. मात्र या बंधा-यातील फुटक्या लोखंडी प्लेट आणि कुचकामी वायसर प्लेटच्या सांध्यातून लाखो लिटर पाण्याची गळती होऊ लागली आहे. त्यामुळे बंधा-यात साठलेले पाणी लवकरच संपुष्टात येऊन पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे. दरम्यान, बंधाऱ्यातील पाणी गळती थांबविण्याची मागणी मनसे पदाधिका-यांनी प्रशासनाकडे करून आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news