परभणी : पूर्णेच्या बंधाऱ्यातून लाखो लिटर पाण्याची गळती

परभणी : पूर्णेच्या बंधाऱ्यातून लाखो लिटर पाण्याची गळती


पूर्णा: शहराला पाणीपुरवठा केल्या जाणाऱ्या पूर्णा नदीवरील रहाटी बंधा-यातून सोडलेल्या पाण्याला नादूरुस्त व फुटक्या बंधा-यामुळे गळती लागली आहे. त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया जात आहे. याकडे परभणी येथील मृद व जलसंधारण खात्याचे संबंधित अधिकाऱ्यांकडून डोळेझाक होत आहे. Parbhani

येथील बंधा-याच्या बकाल अवस्थेची बातमी 'दै पुढारी' च्या दि. ९ फेब्रुवारीच्या अंकात प्रकाशित करण्यात आली होती. त्याची दखल घेत आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे काका मित्रमंडळाचे तालुकाध्यक्ष गणेशराव कदम, तालुका प्रभारी सुभाषराव देसाई व माजी पं. स. सदस्य छगनराव मोरे यांच्यासह ग्रामीण भागातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आमदार गुट्टे यांची भेट घेऊन पूर्णेच्या बंधा-यात रहाटी बंधा-यातून पाणी सोडण्याची मागणी केली होती. Parbhani

आमदार डॉ. गुट्टे यांनी जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी आणि नगरपरिषदेचे प्रशासक यांच्याशी संपर्क साधला होता. त्यानंतर रहाटी बंधा-यातून पाणी सोडण्यात आले. मात्र या बंधा-यातील फुटक्या लोखंडी प्लेट आणि कुचकामी वायसर प्लेटच्या सांध्यातून लाखो लिटर पाण्याची गळती होऊ लागली आहे. त्यामुळे बंधा-यात साठलेले पाणी लवकरच संपुष्टात येऊन पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे. दरम्यान, बंधाऱ्यातील पाणी गळती थांबविण्याची मागणी मनसे पदाधिका-यांनी प्रशासनाकडे करून आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news