जिंतूर(परभणी), पुढारी वृत्तसेवा : जिंतूर तालुक्यातील पांगरी शिवारात अचानक वादळ वाऱ्यासह गारांसह पाउस झाला. दरम्यान अचानक विज कोसळल्याने मेंढी पाल करणा-या युवकाचा जागीच मृत्यू झाला असून अन्य दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. तर 20 पेक्षा जास्त शेळ्यांचा मृत्यु झाला. ही घटना 26 एप्रिल सायंकाळच्या वेळी घडली.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पांगरी येथील शेतकरी अंजीराम जाहाने यांच्या शेतात तीन युवक काम करत असताना या शेतात अचानक विज कोसळल्याने शेळीपालन करणारा युवक गणेश अजीराम जाहाने (वय 17) याच्या अंगावर वीज पडल्याने तो जागीच ठार झाला. त्याच्यासोबत असलेला बाळू मुंजाभाऊ लोणकर (वय 19) रा. चांदज ता. जिंतूर, माधव आत्माराम मांदळे रा. पांगरी ता. जिंतूर हे युवक गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर प्राथमिक उपचार ग्रामीण रुग्णालयात करून पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
-हेही वाचा