नांदेड : पुढारी वृत्तसेवा: काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचे सोमवारी (दि.७) रात्री 9 च्या सुमारास देगलूर येथे आगमन होणार आहे. तेलंगणा सीमेवरील शेवटचे गाव असणार्या मेनुरू येथे थोड्याच वेळात यात्रा पोहोचणार आहे. त्याठिकाणी काँग्रेसचे तेलंगणा प्रदेशाध्यक्ष रेवंथ रेड्डी हे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे काँग्रेसचा ध्वज प्रदान करतील. त्यानंतर तेथे छोटेखानी सभा होणार असून यात्रा देगलूरकडे रवाना होईल.
महाराष्ट्रातील यात्रेचे पहिले स्थान देगलूर असून, यात्रेचे स्वागत झाल्यानंतर शहरापासून दहा किमी अंतरावर असणार्या वन्नालि गुरूव्दारात राहुल गांधी पोहोचणार आहेत. मंगळवारी गुरूनानक जयंतीचा सोहळा असल्याने ते काही वेळ भजन, कीर्तनात घालविण्याचीही शक्यता आहे. त्यानंतर ते देगलूर मुक्कामी थांबणार आहेत. मंगळवारी सकाळी यात्रा शंकरनगरकडे प्रस्थान करणार आहे.
हेही वाचलंत का ?