जो नेता छगन भुजबळांच्या आहारी गेला तो संपला : मनोज जरांगे पाटील यांची टीका

जरांगे पाटील म्हणाले की, जोपर्यंत काँग्रेसचा सुपडा साफ होत नाही, तोपर्यंत ते गप्प बसणार नाहीत.
मनोज जरांगे पाटील
जो नेता छगन भुजबळांच्या आहारी गेला तो संपला : मनोज जरांगे पाटील यांची टीकाFile Photo
Published on
Updated on

Manoj Jarange Patil's criticism of Chhagan Bhujbal

वडीगोद्री, पुढारी वृत्तसेवा : जो नेता छगन भुजबळ यांच्या आहारी जातो तो संपतो, अशी टीका मनोज जरांगे पाटील यांनी नागपूर येथील ओबीसी मोर्चानंतर काँग्रेस नेते वडेट्टीवार यांच्यावर गुरुवारी (दि.९) केली. माध्यमांशी बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, जोपर्यंत काँग्रेसचा सुपडा साफ होत नाही, तोपर्यंत ते गप्प बसणार नाहीत.

मनोज जरांगे पाटील
रेंगेंकडून राज्यातील कठीण एएमके ट्रेक १४ तासांत पूर्ण

छगन भुजबळ यांच्या षडयंत्रात विजय वडेट्टीवारसुद्धा गुंतले आहेत. चांगला माणूस होता, चांगला विरोधी पक्षनेता होता, चांगले काम करत होता, परंतु आता काँग्रेसचा सुपडासाफ करायला निघाला आहे.

जरांगे पाटील पुढे म्हणाले की, मराठा समाजाला ४८ टक्के आरक्षण आहे, असे वडेट्टीवार म्हणाले. वडेट्टीवार यांना वेड लागलंय, कितीतरी जाती ओबीसीमध्ये आल्या त्यांना हे दिसत नाही का? त्यांच्या जागा कमी झाल्या. ज्या जाती ओबीसीमध्ये बसत नाही, त्या त्यांना चालतात. जो समाज मागासवर्गीय आयोगाचे निकष पूर्ण करत नाही तो समाजसुद्धा त्यांना ओबीसीमध्ये चालतो.

मनोज जरांगे पाटील
Gold Price High : सणासुदीच्या काळात सोन्याला झळाळी, १ लाख २० हजारांपर्यंत भाव

त्यांचे दुखणे आणि द्वेष फक्त मराठा समाजाचा आहे. फक्त मराठ्यांना काही नाही मिळाले पाहिजे. त्यांच्या मनामध्ये मराठ्यांविषयी राग आणि द्वेष आहे. जे छगन भुजबळांच्या आहारी गेलेले लोक आहेत. परळीची एक लाभार्थी टोळी आजपासून त्याला किंमत द्यायची नाही, त्याची काय अवकात आहे, अशी टीका मनोज जरांगे पाटील यांनी विजय वडेट्टीवार यांच्यावर केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news