

जालना : स्वच्छता व पाणीपुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांचे मागील पाच महिन्यांपासून मानधन प्रलंबित आहे. या गंभीर परिस्थितीमुळे कर्मचाऱ्यांवर व त्यांच्या कुटुंबीयांवर आर्थिक संकट ओढावले आहे. यामुळे कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलनाचा आक्रमक पवित्रा घेतला आहे. शुक्रवार दि. 6 रोजी तिसऱ्या दिवशीही आंदोलन सुरू होते.
या आंदोलनाला अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघाचे राज्याध्यक्ष रमेशचंद्र चिलबुले व सरचिटणीस संजय महाळनकर, महाराष्ट्र विकास सेवा राजपत्रित अधिकारी संघटनेचे अध्यक्ष लिंबाजी बारगिरे व सचिव समीर जाधव, महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष डी. बी. काळे, विभागीय उपाध्यक्ष पी. बी. पवार व सरचिटणीस संजय चव्हाण, महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनियन (136) चे अध्यक्ष डी. बी. काळे व सरचिटणीस विनोद भगत, कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष विनोद भगत व उपाध्यक्ष गोविंद इंगळे, तसेच महाराष्ट्र राज्य विस्तार अधिकारी संघटनेचे अध्यक्ष ए. ए. चव्हाण व सचिव प्रेमकुमार खिल्लारे यांनी सक्रिय पाठिंबा दर्शविला आहे. कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्याची त्यांनी यावेळी मागणी केली.