

Incidence of bokdya on chillies, quality declined; Farmers in trouble
आन्वा, पुढारी वृत्तसेवाः मिरची पिकावर सध्यस्थीतीत बोकड्या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. यामुळे मिरची पिकाची गुणवत्ता घसरली आहे. परिणामी, भोकरदन तालुक्यातील मिरची उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.
दरम्यान भोकरदन तालुका मिरची शेती उत्पादक म्हणून ओळखल्या जातो. मात्र, यावर्षी मिरचीवर चुरडा, मुरडा आणि बोकड्या नावाच्या रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे मिरचीची क्वालिटी घसरली असून तिचा दरही कमी झाला आहे.
यंदा पावसाचे उशीरा आगमन झाले असून वातावरण बदलामुळे मिरचीवर चुरडा, मुरडा आणि बोकड्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे पाहायला मिळत आहे. या रोगामुळे मिरचीची उत्पादन क्षमता कमी झाल्याने मिरचीची वाढ खुंटली आहे.
मिरचीचे उत्पादन कमी सोबतच क्वालिटीही नसल्याने स्थितीत मिरची नाईलाजाने अनेक शेतकऱ्यांनी मिरची पिक उपटून फेकली आहेत. परिणामी, दिल्ली आणि बंगळुरुला जाणाऱ्या मिरचीची खेप यावर्षी जाणार नसल्याने भोकरदन तालुक्यातील शेतकरी अडचणीत सापडला आहे.