जालना : विहिरीत पडून विवाहित महिलेचा मृत्यू

जालना : विहिरीत पडून विवाहित महिलेचा मृत्यू

जळगाव सपकाळ ; पुढारी वृत्तसेवा : भोकरदन तालुक्यातील जळगाव सपकाळ येथे विवाहित महिलेचा विहिरीत पडून मृत्यू झाला. वर्षा सुरेश पवार (वय २५) असे मयत महिलेचे नाव आहे. बाबू किसन सपकाळ यांच्या फिर्यादीवरून पारध पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, मयत महिला आज (शुक्रवार) सकाळी साडेनऊ वाजता घराबाहेर गेली होती. ती घरी परत लवकर न आल्याने नातेवाईकांनी आजूबाजूला तिचा शोध घेतला. यावेळी येथील रुस्तुम तेजराव सपकाळ यांच्या पांढरी नावाच्या शेतातील विहिरीत तिचा मृतदेह आढळून आला. मयत महिला सातपळस (ता. यावल जि. जळगाव) येथील रहिवासी असून सध्या जळगाव सपकाळ येथे माहेरी राहत होती. मयत वर्षा पवार या मागील तीन वर्षांपासून मानसिक आजाराने ग्रस्त होत्या. प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांकडे देण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रुपेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पी. एन. सिनकर, बी. एम. चौधरी करत आहेत.

हेही वाचलंत का ? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news