जालना: शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीचे पंचनामे करा: अब्दुल सत्तार

जालना: शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीचे पंचनामे करा: अब्दुल सत्तार
Published on
Updated on

वडीगोद्री, पुढारी वृत्तसेवा: शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे आदेश राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी जिल्हा प्रशासनास दिले. सत्तार यांनी अंबड तालुक्यातील वडीगोद्री येथे नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली. यावेळी ते बोलत होते.

अंबड तालुक्यातील वडीगोद्री परिसरामध्ये गुरुवारी (दि.१६) रात्री वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पाऊस व गारपीट झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. रब्बी हंगामातील काढणीस आलेल्या गहू, हरभरा, ज्वारी आदी पिकांसह मोसंबी बागांचे मोठे नुकसान झाले आहे.

यावेळी अंतरवाली सराटी शिवारातील गट नंबर 197 मधील संजय कुमार तांदळे यांच्या शेतातील वादळी वाऱ्यासह गारपिटीने आडवा झालेल्या गहू पिकाच्या नुकसानीची पाहणी सत्तार यांनी केली. या पाहणी दरम्यान त्यांनी नुकसानीचे पंचनामे करून अहवाल सादर करण्याच्या सूचना कृषी अधिकारी भिमराव रणदिवे यांना दिल्या.

यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश काळे, तालुका कृषी अधिकारी सचिन गिरी, नायब तहसीलदार धनश्री भालचिम, स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेचे मराठवाडा अध्यक्ष गणेश गावडे, बप्पासाहेब काळे, उमेश बर्वे, सेवानिवृत्त मंडळ कृषी अधिकारी हनुमंत काळे, कैलास माने, ऋषिकेश लिपणे, पवन पवार, रविंद्र घाडगे आदी उपस्थित होते.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news