हिंगोली ; पुढारी वृत्तसेवा औंढा नागनाथ तालुक्यातील बोरगाव शिवारामध्ये शेतातील हळद गाेळा करीत असताना शेतकरी शेतमजूर पिराजी विठ्ठल चव्हाण (वय 33) याचा वीज पडून जागीच मृत्यू झाला, तर अनखळी पोटा येथे माधव ढवळे यांच्या शेतात वीज पडल्यामुळे बैल दगावल्याची घटना आज दुपारी साडेबारा वाजण्याच्या दरम्यान घडली.
औंढा नागनाथ येथील पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली असून, पुढील कार्यवाही करण्यासाठी तहसीलदार डॉक्टर कृष्णा कानगुले वैजनाथ भालेराव यांनी कर्मचाऱ्यांना आदेशित केले आहे. पिराजी चव्हाण यांच्या मृत्यू झाल्याच्या बातमीने आई लताबाई चव्हाण, पत्नी शारदा चव्हाण व नुकतेच जन्मलेले लहान बाळ यांचा आक्रोश पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले.
हेही वाचा :