Maharashtra politics news: मंत्री संजय शिरसाठ यांच्या एक, दोन नाही तर तीन-तीन चौकश्या सुरू

Sanjay Shirsat inquiries: माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा दावा
Maharashtra politics news
Maharashtra politics news
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्या गैरव्यवहारांची विविध प्रकरणे बाहेर काढली होती. सध्या त्यांच्या एक नाही, दोन नाही तर तीन तीन चौकशा सुरू आहेत. त्यामुळेच ते गप्प आहेत, असा दावा माजी विरोधी पक्षनेता अंबादास दानवे यांनी बुधवारी (दि.८) केला.

Maharashtra politics news
Sanjay Shirsat: संजय शिरसाठ पुन्हा अडचणीत, रोहित पवारांचा नवा आरोप, 15 एकर जमिनीचा वाद काय आहे?

विरोधी पक्षांकडून मध्यंतरी मंत्री शिरसाठ यांच्या विरोधात विविध प्रकारचे गंभीर स्वरूपाचे आरोप केले होते. मात्र काही दिवसांपासून विरोधी पक्षांकडून या प्रकरणांचा पाठपुरावा बंद झाल्याचे चित्र आहे. याविषयी विचारले असता दानवे म्हणाले की, "आम्ही मंत्री शिरसाट यांचे विविध प्रकरणे बाहेर काढली होती. त्यावर राज्य सरकारने आम्हाला चौकशीचे आदेश दिले होते. माझ्या माहितीनुसार सध्या त्या प्रकरणात चौकशा सुरू आहेत. एक नाही दोन नाही तर सध्या शिरसाठ यांच्या तीन चौकशी सुरू आहेत. म्हणूनच ते गप्प आहेत अन्यथा ते दररोज सकाळी बोलत होते, आता त्यांचे बोलणे बंद झाले आहे", असेही दानवे म्हणाले.

Maharashtra politics news
Sword Attack : तुपे बंधूंवर शिरसाठ बाप-लेकांचा तलवारीने जीवघेणा हल्ला

दानवे मूर्खांच्या नंदनवनात वावरत आहेत; शिरसाट

तीन तीन चौकश्या सुरू असल्याचा दानवे यांनी केलेला दावा मंत्री संजय शिरसाट यांनी फेटाळून लावला आहे. दानवे हे सध्या मूर्खांच्या नंदनवनात वावरत आहेत त्यामुळे मी त्यांच्या वक्तव्याला महत्त्व देत नाही असेही मंत्री शिरसाट यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news