Sambhajinagar News : कनिष्ठ महाविद्यालये पडणार ओस, पाच जिल्ह्यांत सव्वालाख जागा राहणार रिक्त

अकरावीसाठी प्रवेश क्षमतेपेक्षा नोंदणी खूपच कमी
Sambhajinagar News
Sambhajinagar News : कनिष्ठ महाविद्यालये पडणार ओस, पाच जिल्ह्यांत सव्वालाख जागा राहणार रिक्त File Photo
Published on
Updated on

Junior colleges will be deserted, 1.25 lakh seats will remain vacant in five districts

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : छत्रपती संभाजीनगरच्या शिक्षण उपसंचालक कार्यालयांतर्गत येणाऱ्या पाचही जिल्ह्यांत यंदा इयत्ता अकरावी प्रवेशाच्या तब्बल १ लाख २० हजार जागा रिक्त रा हणार आहेत. या पाच जिल्ह्यांत एकूण १३४३ महाविद्यालये असून, त्यांची एकत्रित प्रवेश क्षमता २ लाख ६६ हजार ७५० इतकी आहे. परंतु प्रत्यक्षात ऑनलाईन पद्धतीने केवळ १ लाख ४० हजार ६७विद्यार्थ्यांनीच नोंदणी केली आहे. त्यामुळे असंख्य महाविद्यालये विद्याथ्यांविना राहणार आहेत.

Sambhajinagar News
Chhatrapati Sambhajinagar Political News : पालकमंत्री शिरसाटांच्या मुलाकडून माघारीचे पत्र नाही

यंदा राज्यात सर्वत्र इयत्ता अकरावीची प्रवेश प्रक्रिया केंद्रीय स्तरावरून ऑनलाईन पद्धतीने राबविली जात आहे. २६ मेपासून ऑनलाईन नोंदणीला सुरुवात झाली. त्यात विद्यार्थ्यांना किमान १ आणि कमाल १० महाविद्यालयांचे पर्याय देण्याची मुभा देण्यात आली होती. यात छत्रपती संभाजीनगर विभागात एकूण १ लाख ४० हजार ६७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

छत्रपती संभाजीनगर विभागात छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी आणि हिंगोली पाच जिल्हो येतात. या पाच जिल्ह्यांमध्ये एकूण १३४३ कनिष्ठ महाविद्यालये आहेत. या सर्व महाविद्यालयांची एकत्रित प्रवेश क्षमता ही २ लाख ६६ हजार ७५० इतकी आहे. यामध्ये कला शाखेची १ लाख ११ हजार १६५, वाणिज्य शाखेची ४२ हजार ६१५ आणि विज्ञान शाखेची १ लाख १२ हजार ६७० इतकी प्रवेश क्षमता आहे. त्यामुळे विभागात तब्बल १ लाख २० हजार जागा रिक्त राहणार असल्याने अनेक कनिष्ठ महाविद्यालयांना पुरेसे विद्यार्थी मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. परिणामी कनिष्ठ महाविद्यालये अडचणीत सापडले आहेत.

Sambhajinagar News
Life-Threatening Reel : पाण्यात उतरून तरुणांची जीवघेणी रील

गतवर्षीपर्यंत मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर आणि अमरावती या पाच विभागांतील अकरावीच्या विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबवली जात होती. तर मराठवाड्यात पारंपरिक पद्धतीने कनिष्ठ महाविद्यालयाच्या स्तरावरच प्रवेश देण्यात येत होते. मात्र येत्या शैक्षणिक वर्षापासून राज्यात सर्वत्रच अकरावीचे प्रवेश केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने राबवण्यात येत आहे.

अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. 66 विभागात अकरावी प्रवेशाच्या खूप अधिक जागा उपलब्ध आहेत. त्यामुळे नोंदणी केलेल्या सर्व विद्यार्थ्यांनाच प्रवेश मिळणार आहेत. उपलब्ध जागांमध्ये स्वयंअर्थसहाय्यित महाविद्यालयांच्या वाढीव तुकड्यांचा समावेश असतो. त्यामुळे जागा रिक्त राहिल्या तरी महाविद्यालयांचे नुकसान होणार नाही.
रवींद्र वाणी, सहाय्यक संचालक.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news