शेतकऱ्यांना दिलासा! नुकसानग्रस्त भागातील कर्जवसुली थांबवणार : कृषी मंत्री दत्ता भरणे यांची घोषणा

Agriculture Minister Datta Bharane announcement: युद्धपातळीवर पंचनामे, दिवाळीपूर्वी खात्यात जमा होणार मदत; राज्य सरकार बँकांना देणार सूचना
Chhatrapati Sambhajinagar
Chhatrapati Sambhajinagar
Published on
Updated on

Flood affected area farmers loan recovery stopped news

छत्रपती संभाजीनगर: राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, शासन गंभीरतेने याचा आढावा घेत आहे. ज्या भागात पिकांचे नुकसान झाले आहे त्या ठिकाणी कर्जवसुली थांबवलीच पाहिजे. त्याबाबत राज्य सरकार बँकांना स्पष्ट सूचना देणार आहे, अशी माहिती बुधवारी (दि.२४) राज्याचे कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Chhatrapati Sambhajinagar
Ola Dushkal 2025 : जळगाव जिल्ह्यातील 15 मंडळांमध्ये अतिवृष्टी

राज्यभर नुकसानग्रस्तांचे पंचनामे युद्धपातळीवर

यावेळी ते म्हणाले की, जालना जिल्ह्यात तब्बल २ लाख ५४ हजार एकर क्षेत्र पिकांचे नुकसान झाले आहे. नांदेड जिल्हा सर्वाधिक नुकसानग्रस्त असून, अनेक शेतकरी संकटात सापडले आहेत. सर्वत्र पंचनामे युद्धपातळीवर सुरू असून, महसूल आणि कृषी विभागाचे कर्मचारी स्वतः शेतावर जाऊन तपासणी करत आहेत.

Chhatrapati Sambhajinagar
Crop Damage Due to Heavy Rain: शिरदाळे परिसरात अतिवृष्टीमुळे पिकांना फटका; हातातोंडाशी आलेले बटाटा, सोयाबीन, मका धोक्यात

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात २२१५ कोटी रुपये निधी जमा

शेतकऱ्यांना कोणतेही फोटो काढून देण्याची गरज नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच राज्य सरकारने नुकसानीसाठी मदतीची प्रक्रिया गतीमान असून मंगळवारी (दि.२३) शासनाकडून २२१५ कोटी रुपये निधी जमा करण्यात आला आहे. दरम्यान अजूनही आकडेवारी वाढत आहे. त्या प्रमाणात थेट शेतकऱ्यांच्या खात्यात मदत जमा केली जाईल. दिवाळीपूर्वी कोणतीही मदत थांबणार नाही, प्रत्येक शेतकऱ्याला दिलासा मिळेल, असे आश्वासन भरणे यांनी यावेळी दिले. या

Chhatrapati Sambhajinagar
School Closure Solapur | अतिवृष्टीमुळे सोलापूर जिल्हयातील सहा तालुक्यातील शाळांना सुट्टी जाहीर

राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्नशील

यावेळी त्यांनी सांगितले की, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री स्वतः शेतकरी बांधवांची भेट घेऊन परिस्थितीचा थेट आढावा घेत आहेत. पावसामुळे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्नशील असल्याचेही ते म्हणाले.

Chhatrapati Sambhajinagar
Dharashiv Paranda Flood | परंडा तालुक्यात अतिवृष्टीमुळे हाहाकार; नागरिकांची हेलीकॉप्टरच्या सहाय्याने सुटका; एनडीआरएफ, लष्करी जवानांकडून मदतकार्य

या संकट काळात शासन ठामपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी

शेतकऱ्यांवरील कर्जवसुली थांबवण्याच्या निर्णयामुळे त्यांना दिलासा मिळणार असून, पंचनाम्यांनंतरची मदत थेट बँक खात्यात जमा होणार आहे. त्यामुळे या संकट काळात शेतकरी एकटे नाहीत, शासन त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे, असेही मंत्री भरणे यांनी यावेळी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news