माजलगाव : संपुर्ण राज्यभर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जन सन्मान यात्रा सुरु आहे. मंगळवारी (दि.1) ही जन सन्मान यात्रा माजलगाव येथे येऊन त्याचा समारोप होणार आहे. मात्र, या ठिकाणी आयोजक कत्राटदाराकडून कार्यक्रमस्थळी वीजचोरी करण्यात आलेली असल्याची घटना उघडकीस आली आहे.
माजळगाव येथील मंगलनाथ मैदानामध्ये या यात्रेनिमित्त भव्य सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सभास्थळी मागील चार दिवसापासून भव्य अशा मंडपाची उभारणीचे काम सुरू आहे. तेव्हापासून जवळच असलेल्या एका रोहीञावरून डायरेक्ट आकडे टाकून विजेचा वापर सुरू आहे. यासाठी संबंधित मंडप उभारणी वाल्यांनी वीज वितरण कंपनीकडून यासाठी कसल्याच प्रकारची परवानगी घेतली नसल्याचे देखील सांगण्यात येत आहे. सोमवारी (दि.30) संध्याकाळी सात वाजेपर्यंत हे आकडे तसेच दिसून येत होते. तीन दिवसांपूर्वी वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी जाऊन विचारणा केली असता आम्ही जनरेटर लावून असल्याचे सांगितले होते. परंतु 3-4 दिवसांपासून या ठिकाणी आकडे टाकून विच चोरी करण्यात येत आहे.