Manoj Jarange Patil : भुजबळ खालच्या विचारांचे त्यांच्या मनात मराठ्यांविषयी विष : जरांगे

Manoj Jarange Patil : भुजबळ खालच्या विचारांचे त्यांच्या मनात मराठ्यांविषयी विष : जरांगे

पुढारी ऑनलाईन डेस्क : "छगन भुजबळ खालच्या विचारांचे आहेत, हे मराठ्यांना माहीत असत तर इतकं मोठं केलच नसतं. मराठा समाजाने त्यांना चांगलं समजून आयुष्यभर मोठं केलं. पण आता ते किती खालच्या विचारांचे आहेत आणि मराठ्यांबद्दल त्यांच्यात किती विष पेरलेलं आहे, हे समजलं. आम्हाला कुजकं आणि चांगले शब्द कळतात, आम्ही रानात औत हाणणारी लोकं आहोत, आमच्या नादी लागू नका," असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange Patil) यांनी दिला.

मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची बीडमध्ये आज (दि.२३) इशारा सभा होणार आहे. तत्पुर्वी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जरांगे पाटील म्हणाले की, आजच्या सभेतून मराठ्यांसमोर आरक्षणाची भूमिका मांडणार आहे. सरकार कधीपर्यंत आमच्या संयमाचा अंत बघणार आहात. मराठ्यांनीच प्रत्येक वेळी शब्द पाळायचे. मराठा समाजाने खूप वेळ दिला, पण सरकार दिलेले शब्द पाळत नाही. मराठा समाजासमोर आज खरी परिस्थिती ठेवणार. सरकारच्या हातात आजचा आणि उद्याचा दिवस आहे. मराठा समाजाला सरसकट आरक्षण या मागणीशी आजही ठाम आहे. सरकारला आता वेळ मिळणार नाही. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि शिष्टमंडळाचा कायम सन्मान केला. प्रत्येक शब्द पाळला. पण सरकारने आता चर्चेत गुंतवून ठेवू नये. सरकारला वेळ देणार नाही, असे जरांगे यांनी म्हटले आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news