औरंगाबादच्या नामांतराचा निर्णय बदलण्याबाबत मुख्यमंत्री शिंदेंचे मोठे विधान, म्हणाले… ‘अशक्य…’!

संग्रहित फोटो
संग्रहित फोटो
Published on
Updated on

औरंगाबाद; पुढारी वृत्तसेवा : राज्याच्या मंत्रिमंडळाने औरंगाबाद शहराचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता तो निर्णय बदलणे अशक्य आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी औरंगाबाद नामांतर विरोधी संघर्ष कृती समितीला सांगितले.

औरंगाबाद नामांतर विरोधी संघर्ष कृती समितीच्या शिष्टमंडळाने रविवारी खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री शिंदे यांची सुभेदारी विश्रामगृह येथे भेट घेतली. यावेळी शिष्टमंडळाने औरंगाबादचे नामांतर करण्यात येऊ नये, अशी विनंती मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे केली. औरंगाबादच्या नावाला ऐतिहासिक वारसा आहे. राज्य सरकारने नामांतराचा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केली. यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी नामांतराचा निर्णय बदलणे अशक्य असल्याचे स्पष्ट केले.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news