बीड : साठ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

बीड : साठ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या
Published on
Updated on

गेवराई, पुढारी वृत्तसेवा : कर्जबाजारीपणाला कंटाळून एका साठ वर्षीय वयोवृद्ध शेतकऱ्याने बंगाली पिंपळा शिवारात लिंबाच्या झाडाला  गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गेवराई तालुक्यातील सुशी येथे घडली. उध्दव भगवानराव पौळ ( वय ६०, रा. सुशी ता. गेवराई) असे आत्महत्या केलेल्या वयोवृद्ध शेतकऱ्याचे नाव आहे. सदरील घटनेमुळे परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

 कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केल्याची माहिती नातेवाईकांकडून सांगण्यात आले. दरम्यान चकलंबा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला असून त्यांच्यावर सुशी येथील पौळ यांच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान घटनेचा पुढील तपास चकलंबा पोलिस करत आहेत. घटनास्थळी पोलीस कॉस्टेबल इंगवले यांनी भेट देवून  पंचनामा केला.

हेही वाचलंत का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news