Kolhapur Flood | पंचगंगा धोकापातळीकडे; चिखली ग्रामस्थांचे स्थलांतर सुरू

पंचगंगेच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ
Kolhapur Flood
पंचगंगेच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत असून पंचगंगने धोका पातळी गाठली आहे. File Photo

पुढारी ऑनलाईन डेस्क : पंचगंगेच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत असून पंचगंगने धोका पातळी गाठली आहे. त्यामुळे चिखली (ता. करवीर) गावातील नागरिकांनी स्थलांतर करण्यास आज (दि.२४) सुरूवात केली आहे. पहिल्यांदा जनावरांचे स्थलांतर केले जात आहे. त्यानंतर जीवनावश्यक साहित्यासह नागरिक स्थलांतर करणार असल्याचे सांगितले जात आहे. (Kolhapur Flood)

Kolhapur Flood
कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावर कंटेनरचा अपघात

राधानगरी धरणातून १५०० क्युसेक विसर्ग सुरू

राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात संततधार कायम असून पंचगंगा नदी धोक्याची पातळी ओलांडत आहे. राधानगरी धरणातून १५०० क्युसेक विसर्ग सुरू आहे. तर दूधगंगा धरणात सरासरी पाणी पातळी झाल्यामुळे नियंत्रणासाठी १६०० क्युसेक विसर्ग होणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पूर परिस्थितीमध्ये वाढ होण्याची शक्यता गृहीत धरून सर्वांनी सतर्क रहावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. (Kolhapur Flood)

Kolhapur Flood
कोल्हापूर, सांगलीला दिलासा; अलमट्टी धरणातून विसर्ग वाढवला

पुरस्थितीच्या अनुषंगाने प्रशासन सज्ज

संभाव्य पुरस्‍थितीच्या अनुषंगाने प्रशासन अलर्ट मोडवर आहे. नदी किणाऱ्यावरील नागरिकांना प्रशासनाकडून सुरक्षित स्‍थळी स्‍थलांतर होण्याच्या सूचना देण्यात आल्‍या आहेत. तसेच आपत्‍कालिन प्रसंगाला तोंड देण्यासाठी जिल्‍हा प्रशासनाने सर्व तयारी केली आहे. यावेळी नागरिकांनी सहकार्य करण्याचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे आवाहन केले आहे.(Kolhapur Flood)

Kolhapur Flood
कोल्हापूर : चांदोली धरणातून वारणा नदीत पाण्याचा विसर्ग सुरू

पंचगंगा नदीची पाणीपातळी 41 फूट 11 इंचावर

पंचगंगा नदीची धोका पातळी कडे वाटचाल सुरूच आहे. पंचगंगा नदीची पाणीपातळी 41 फूट 11 इंचावर पोहचली आहे. धोका पातळी 43 फूट आहे. मुसळधार पावसामुळे 81 बंधारे पाण्याखाली गेल्याने वाहतूक विस्कळित झाली आहे. (Kolhapur Flood)

Kolhapur Flood
कोल्हापूर : प्रशासन सज्ज, गरज पडल्यास स्थलांतर

पूरग्रस्त भागातील 157 कुटुंबे सुरक्षित स्थळी

जिल्ह्यातील सर्वच नद्या या संत गतीने धोका पातळीकडे वाटचाल करत असल्याने नदीकाठी चिंता वाढली असून, त्यांचे स्थलांतर सुरू झालं आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने पूरग्रस्त भागातील 157 कुटुंबे सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आली आहेत. तर 20 मार्गावरील एसटी सेवा बंद असल्याने प्रवाशांना मोठा फटका बसला आहे. सध्या जिल्ह्यात सर्वत्र पाऊस जोरदार सुरु असल्यामुळे आवश्यकता असेल तरच घराबोहर पडा, तसेच पुरस्थितीच्या अनुषंगाने प्रशासन सज्ज असून नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे. (Kolhapur Flood)

Kolhapur Flood
कोल्हापूर : पंचगंगा धोका पातळीकडे

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news