![राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2022%2F06%2F%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%81%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%80.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
गुडाळ(कोल्हापूर ), पुढारी वृत्तसेवा : राधानगरी तालुक्यातील नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकात विजयी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नवनिर्वाचित सरपंच आणि सदस्यांचा मेळावा आणि सत्कार सोहळा बुधवार, 28 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजता गुडाळ येथे आयोजित केला आहे. याबाबत राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष तथा गोकुळचे संचालक प्रा. किसनराव चौगले यांनी माहिती दिली.
राधानगरी तालुक्यात 66 ग्रामपंचायत निवडणुका पार पडल्या. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए.वाय.पाटील यांच्या संघटनात्मक बांधणीमुळे राष्ट्रवादीचे सर्वाधिक 38 सरपंच आणि 258 ग्रामपंचायत सदस्य निवडून आले आहेत, असेही चौगले यांनी सांगितले.
या सर्व विजयी उमेदवारांचे सत्कार राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए.वाय.पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार आहेत. तालुक्यातील राष्ट्रवादीचे सर्व प्रमुख कार्यकर्ते, भोगावती- बिद्रीचे आजी-माजी संचालक, जि. प. पंचायत समितीचे माजी पदाधिकारी-सदस्य आदी मान्यवर या मेळाव्यास उपस्थित राहणार आहेत. तालुक्यातील राष्ट्रवादीच्या सर्व नवनिर्वाचित सरपंच-सदस्य यांनी गुडाळ येथील गुडाळेश्वर मल्टीपर्पज हॉलमध्ये उपस्थित रहावे, असे आवाहन किसनराव चौगले यांनी केले आहे.
हेही वाचा :