शिये परिसरात गव्यांच्या कळपाचा धुमाकूळ; शेतीचे नुकसान, शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण

गव्यांच्या वावरामुळे प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Herd of Gaurs Wreaks Havoc in Shiye Area
शिये परिसरात गव्यांच्या कळपाचा धुमाकूळ; शेतीचे नुकसान, शेतकऱ्यांत भीतीचे वातावरणfile photo
Published on
Updated on

Herd of Gaurs Wreaks Havoc in Shiye Area; Crops Damaged

नागाव : पुढारी वृत्तसेवा

करवीर तालुक्यातील शिये आणि परिसरातील जंगल क्षेत्राला लागून असलेल्या शेतीमध्ये गव्यांच्या कळपाने गेल्या काही दिवसांपासून अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. या कळपाने हातातोंडाशी आलेली पिके फस्त केल्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, परिसरात गव्यांच्या वावरामुळे प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने तातडीने या गव्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

Herd of Gaurs Wreaks Havoc in Shiye Area
Shahuwadi wildlife attacks | शाहूवाडीत वन्यजीवांचा वाढता धुमाकूळ; पाळीव जनावरांसह शेतीवर संकट, शेतकरी भयभीत

पिकांचे अतोनात नुकसान

शिये परिसरातील डोंगराळ भागात गेल्या काही दिवसांपासून १५ ते २० गव्यांचा कळप ठाण मांडून आहे. हे गवे रात्रीच्या वेळी शेतात शिरून ऊस, मका, भुईमूग, हरभरा आणि इतर पिकांची मोठ्या प्रमाणावर नासाडी करत आहेत. अनेक शेतकऱ्यांनी यंदा मोठ्या कष्टाने आणि कर्ज काढून पिके उभी केली होती. मात्र, गव्यांच्या हल्ल्यामुळे ही पिके आता जमिनीला लागली आहेत. रात्रभर गवे शेतात वावरत असल्याने पिकांचे नुकसान तर होत आहेच, पण सोबतच शेतीची कामे करणेही कठीण झाले आहे.

शेतकऱ्यांमध्ये दहशतीचे सावट

गव्यांचा कळप फक्त रात्रीच नव्हे, तर पहाटेच्या वेळीही दिसून येत असल्याने शेतात पाणी पाजण्यासाठी किंवा कामासाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये भीती पसरली आहे. "गव्यांमुळे शेतात जायची सोय उरलेली नाही. समोर गव्याचा कळप दिसला की जीव मुठीत धरून पळावे लागते," अशी व्यथा स्थानिक शेतकऱ्यांनी मांडली. या दहशतीमुळे मजुरांनीही शेतात येण्यास नकार दिला असून शेतीची कामे ठप्प झाली आहेत.

Herd of Gaurs Wreaks Havoc in Shiye Area
Kolhapur News : अधिकाऱ्यांनो, तुम्हीच सांगा शेती कशी करायची?

वनविभागाकडे धाव

पिकांचे झालेले नुकसान पाहून हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी आता वनविभागाकडे धाव घेतली आहे. या कळपाचा कायमचा बंदोबस्त करण्यात यावा आणि ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे, त्यांना तातडीने आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

शेतकऱ्यांची मागणी :

"वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी केवळ पाहणी न करता, या गव्यांना जंगलात परत हाकलण्यासाठी ठोस उपाययोजना करावी. अन्यथा आम्हाला आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल."

आता वनविभाग यावर काय पाऊल उचलते आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news