डॉ. प्रतापसिंह जाधव यांचा आज जीवनगौरव पुरस्काराने सन्मान | पुढारी

डॉ. प्रतापसिंह जाधव यांचा आज जीवनगौरव पुरस्काराने सन्मान

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : स्वाभिमानी शेतकरी संघटना व शिवार सामाजिक विकास व संशोधन सेवा संस्थेच्या वतीने रविवारी (दि. 4) पहिले नांगरट साहित्य संमेलन होणार आहे. या संमेलनात दैनिक ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांना ‘स्वाभिमानी जीवनगौरव’ पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. शिवाजी विद्यापीठाच्या वि. स. खांडेकर भाषा भवनाच्या सभागृहात सकाळी नऊ वाजता हा सोहळा होणार आहे.

सकाळी नऊ वाजता प्रसिद्ध वात्रटिकाकार व साहित्यिक रामदास फुटाणे यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. प्रसिद्ध ग्रामीण साहित्यिक, कवी डॉ. विठ्ठल वाघ संमेलनाध्यक्ष असून, माजी खासदार राजू शेट्टी स्वागताध्यक्ष आहेत. या कार्यक्रमाला शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी.टी.शिर्के प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या संमेलनात ज्येष्ठ विचारवंत डॉ.आ.ह.साळुंखे व ज्येष्ठ शेतकरी नेते वामनराव चटप यांचाही सन्मान केला जाणार आहे. या संमेलनासाठी शेतकर्‍यांसह सर्व नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन स्वागताध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले आहे.

उद्घाटनानंतर दुसर्‍या सत्रात ‘शेतकरी प्रश्नांचे कला, साहित्य, माध्यमे व राजकारण यात उमटलेले प्रतिबिंब’ या विषयावर परिसंवाद होणार आहे. दुपारी साडेतीन ते सायंकाळी साडेपाच या तिसर्‍या सत्रात कवी संमेलन होणार आहे. यानंतर संमेलनाची सांगता होणार आहे.

हे ही वाचा:

डॉ. प्रतापसिंह जाधव यांना जीवनगौरव पुरस्कार

बॅ. बाळासाहेब खर्डेकर यांचे कोल्हापुरात चिरंतन स्मारक झाल्यास नव्या पिढीस प्रेरणादायी ठरेल : डॉ. प्रतापसिंह जाधव

Back to top button