

हुपरी; अमजद नदाफ : "भाजप सरकारच्या फसव्या योजनांची जनतेसमोर पोलखोल करण्यासाठी शिवसेना-उद्धव ठाकरे गटाच्यावतीने हातकणंगले लोकसभा मतदारसंघात 'होऊ दे चर्चा' अभियान राबविण्यात येणार आहे. पक्षाच्यावतीने दोन टप्प्यात हे अभियान राबविण्यात येणार असून जनतेची दिशाभूल करणाऱ्या राज्य व केंद्र सरकारविरोधात प्रत्येक विधानसभा मतदारसघांतील गावोगावी या अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे," अशी माहिती ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी दिली. 'होऊ दे चर्चा' अभियानाच्या तयारीसाठी हुपरी येथे आयोजित जिल्हा कार्यकारणी बैठकीत ते बोलत होते.
"सामान्य जनतेमध्ये सरकारच्या बोलघेवड्या योजनांबद्दल असणाऱ्या रोषाला जागृत करण्याच्या उद्देशाने हे अभियान राज्यभर राबविले जाणार आहे. त्याचाच भाग म्हणून पहिल्या टप्प्यातील अभियानाची सुरुवात १२ सप्टेंबर पासून शाहूवाडी तालुक्यातून करण्यात येणार असून ठाकरे गटाच्या उपनेत्या ज्योतीताई ठाकरे व संजना घाडी प्रमुख उपस्थित असणार आहेत," असेही जाधव यांनी सांगितले.
'होऊ दे चर्चा' या अभियानात हातकणंगले लोकसभा मतदासंघातील शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जाधव यांनी केले आहे. बैठकीस उपजिल्हाप्रमुख साताप्पा भवान, मधुकर पाटील, महादेव गौड, नामदेव गिरी, महिला आघाडी जिल्हा संघटिका मंगल चव्हाण, तालुकाप्रमुख वैभव उगळे, आनंदा शेट्टी, बाजीराव पाटील, दत्ता पोवार, बाबासो पाटील, युवासेना जिल्हाधिकारी स्वप्नील मगदूम, विभाग प्रमुख विनायक विभूते, राजेंद्र पाटील, संजय वाईंगडे, नगरसेवक बाळासाहेब मुधाळे, प्रमोद सूर्यवंशी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
हेही वाचा :