कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर जिल्ह्यात बुधवारी पावसाचा जोर कमी झाला असला तरी राधानगरी धरणाचे दोन स्वंयचलित दरवाजे खुले झाले आहेत. त्यातून ४ हजार ४५६ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पंचगंगेची पातळी वाढतच असून ती धोका पातळीकडे (४३ फूट) चालली आहे.
पंचगंगेची धोका पातळी ४३ फूट असुन कुंभी, कोदे, कासारी धरणातून सुरू असलेल्या विसर्गाने पंचगंगा धोका पातळीकडे (४३ फूट) चालली आहे. बुधवारी सकाळी ११ वाजता पंचगंगेची पातळी ४०.३ फुटांपर्यंत गेली आहे. जिल्ह्यातील ७४ बंधारे पाण्याखाली असून त्यावरील वाहतूक पर्यायी मार्गाने सुरू आहे. वारणा धरणातूनही ६ हजार ८७५ क्यूसेक विसर्ग सुरू असल्याने वारणा नदीच्या पाणी पातळीतही झपाट्याने वाढ होत आहे.
हेही वाचा :