कोल्हापूरचा तरुण नदीतून वाहून गेला, एकाचा मृत्यू

कोल्हापूरचा तरुण नदीतून वाहून गेला, एकाचा मृत्यू

रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा : वाटद सुतारवाडी येथील नदीत पोहायला उतरलेले तीन कामगार बुडाल्याची घटना आज (दि. २६) दुपारच्या सुमारास वाटद खंडाळा येथे घडली. यात विक्रम नरेशचंद्र (वय ३४ मूळ रा. उत्तरप्रदेश) या तरुणाचा मृत्यू झाला. तर कोल्हापूर येथील ओमकार जाधव (रा. कोल्हापूर) पाण्यातून वाहून गेला आहे. त्याचा शोध सुरु आहे. तर गोपाळ नायरला वाचवण्यात ग्रामस्थांना यश आले आहे.

रत्नागिरी तालुक्यातील वाटद येथील गाव नदी येथे पोहायला अनेकजण येत असतात. बुधवारी लावगण येथील हे तीन कामगार पोहण्यासाठी वाटदखंडाळा येथे गेले होते. मागील तीन दिवसांपासून तालुक्यात प्रचंड पाऊस सुरू आहे. नद्या नाले तुडुंब भरून वाहत आहेत.

एकाच कंपनीत कामाला असलेले हे तिघेही दुपारच्या सुमारास नदीत पोहण्यासाठी उतरले होते. अडीच वाजण्याच्या सुमारास अचानक पाण्याचा प्रवाह वाढत गेला. त्यामुळे तिघेजण अचानक गटांगळ्या खाऊ लागले. तिघेही वाहून जाऊ लागले. हा प्रकार ग्रामस्थांनी पाहिल्यानंतर काहीनी पाण्यात उड्या घेतल्या. तिघांपैकी एकाला वाचवण्यात यश आले. तर एकाचा मृतदेह हाती लागला आहे. उर्वरित एकाचा शोध रात्री उशिरा पर्यंत सुरू होता.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news