रत्नागिरी : विजेचा धक्का बसून वायरमनचा जागीच मृत्यू

रत्नागिरी : विजेचा धक्का बसून वायरमनचा जागीच मृत्यू

राजापूर, पुढारी वृत्तसेवा : मुंबई- गोवा महामार्गावर ओणी पेट्रोलपंपासमोर 'डीपी'वर काम करीत असलेल्या महावितरण कर्मचाऱ्याचा विजेचा धक्का बसून जागीच मृत्यू झाला. प्रकाश बाबु गमरे (वय ५२) असे त्‍याचे नाव आहे.  ही घटना आज (दि २७) सकाळी घडली.  या घटनेनंतर नागरिक महावितरणच्या भोंगळ कारभाराविरोधात संताप व्यक्त करत आहेत.

रविवारी गमरे यांची साप्ताहिक सुट्टी असताना त्यांना अधिकाऱ्यांनी कामावर बोलावले होते. ओणी येथील पेट्रोलपंपासमोरील डीपीवर ते दुरुस्तीचे काम करीत असताना अचानक त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला आणि काही क्षणातच गमरे यांची प्राणज्योत मालवली. २० वर्षापासून गमरे महावितरणमध्ये कार्यरत होते.

ही घटना समजताच ओणी परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. गमरे यांची साप्ताहिक सुट्टी असताना त्यांना कामावर बोलावणाऱ्या संबंधित अधिकाऱ्याविरोधात नागरिकांनी रोष व्यक्त केला. संतप्त नागरिकांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. दरम्यान राजापूर पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर त्यांनी संतप्त जमावाला शांत केले. या घटनेमुळे ओणी परिसरात शोककळा पसरली आहे .

हेही वाचलंत का ? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news