नगर : मनपाच्या घरकुलांचा निधी गेला परत

नगर : मनपाच्या घरकुलांचा निधी गेला परत
Published on
Updated on

नगर : पुढारी वृत्तसेवा : पंतप्रधान आवास योजनेंतर्गत अहमदनगर महापालिका कार्यक्षेत्रात संजयनगर, आगरकर मळा, केडगाव भागात घरकुल प्रकल्प उभारण्यास मान्यता दिली होती. त्यातील संजयनगर प्रकल्पाचे 33 घरकुल पूर्ण झाले असून, अन्य 265 सदनिकांचे काम बाकी आहे. 265 घरकुलांचे काम न झाल्याने म्हाडाने राज्याचे 13 लाख 20 हजार व केंद्राचे एक कोटी 39 लाख 20 हजार रुपये शासनाला परत केले. प्रकल्पाचे बांधकाम सुरू झाल्याने निधी पुन्हा मिळू शकतो, असे समजते. नगर शहरात संजयनगर, काटवन खंडोबा, आगरकर मळा, केडगाव उपनगरामध्ये पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घरकुल प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली होती.

गेल्या चार वर्षांपासून संजयनगर येथील प्रकल्पाचे काम सुरू होते. केडगाव येथील प्रकल्प लाभार्थ्यांचा थंड प्रतिसादामुळे रद्द करण्यात आला. तर, आगरकर मळा येथील प्रकल्पाला चार वेळा निविदा करूनही ठेकेदार मिळाला नाही. त्यात संजयनगर येथील प्रकल्पाचे काम गतीने सुरू होते. त्यातील 298 पैकी 33 सदनिकांचे काम पूर्ण होऊन लाभार्थ्यांना त्याचे वाटप करण्यात आले. एकूण मंजूर अनुदानापैकी केंद्र व राज्य शासनाच्या सूचनेनुसार प्रकल्पातील 33 घरांसाठी राज्य शासनाचा पहिला हप्ता (प्रत्येकी 40 हजार) 13 लाख 20 हजार व दुसरा हप्ता 13 लाख 20 हजार असा एकूण 26 लाख 40 हजारांचा निधी प्राप्त झाला. तर, 298 घरकुलांसाठी केंद्र शासनाचा प्रथम हप्ता (प्रत्येकी 60 हजार) एक कोटी 78 हजार 80 हजारांचा निधी महापालिकेला वितरित करण्यात आला होता.

दरम्यान, महापालिकेने राज्य व केंद्र शासनाचा निधी खर्च केला नाही. कारण ठेकेदाराने 33 घरकुलानंतर अन्य घरकुलाचे काम सुरूच केले नाही. चार वर्षांपूर्वी मंजूर झालेल्या कामासाठी आज सिमेंट, लोखंडाचे दर गगणाला भिडले आहेत. त्यामुळे पूर्वीच्या दरात काम करणे परवडत नसल्याचे सांगत संबंधित ठेकेदाराने काम बंद ठेवले. परिणामी महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणने महापालिकेच्या प्रणालीवरील निधी काढून घेतला. ठेकेदार व महापालिका प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे घरकुल प्रकल्पासाठी आलेला निधी परत गेला. आता तो निधी परत आणण्यासाठी म्हाडाशी पत्रव्यवहार करावा लागणार आहे.

असमन्वयाचा कारभार उघडकीस
काटवन खंडोबा येथील गुरूगोविंदसिंग सहकारी गृहनिर्माण संस्थेने संजयनगर येथील घरकुल प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. त्यानुसार म्हाडाने संबंधित संस्थेला निधी देण्याऐवजी निधी परत का घेतला याचे सविस्तर उत्तर दिले. त्यामुळे महापालिका व ठेकेदार यांच्यामधला असमन्वयाचा कारभार उघडकीस आला.

बांधकाम साहित्याचे दर वाढल्याने ठेकेदाराने घरकुल प्रकल्पाचे काम थांबविले. वाढीव निधीसाठी आम्ही प्रस्तावही दिला आहे. परंतु, प्रकल्पाचे काम रखडल्याने निधी परत गेला. बांधकाम सुरू केल्यानंतर तो पुन्हा मिळविता येईल.
                                                               – गणेश गाडळकर, प्रकल्प प्रमुख 

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news