

कोळपेवाडी (नगर ) : पुढारी वृत्तसेवा : मागील आठवड्यात निळवंडे कालव्यांची चाचणी सुरू करण्यात आली असून जवळपास 85 किलोमीटर पर्यंत झालेली यशस्वी चाचणी निळवंडे कालव्यांच्या लाभ क्षेत्रातील शेतकर्यांच्या दृष्टीने अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. मात्र कोपरगाव तालुक्यातील अनेक गावातील निळवंडे कालव्यांच्या पोटचार्यांची कामे अपूर्ण आहेत. त्यामुळे पोटचार्यांची कामे पूर्ण होईपर्यंत एस्केपद्वारे किंवा अन्य माध्यमातून मतदारसंघातील बंधारे भरून देण्यासाठी नियोजन करा, अशा सूचना आ. आशुतोष काळे यांनी निळवंडे कालव्यांच्या अधिकार्यांना दिल्या आहेत.
आ. काळे यांनी कर्मवीर शंकरराव काळे कारखाना कार्यस्थळावर निळवंडे कालव्यांच्या अधिकार्यांसमवेत कोपरगाव मतदार संघातील गावांना निळवंडे कालव्यांचा होणार्या लाभाबाबत निळवंडे कालव्यांच्या कामाची आढावा बैठक घेतली. या बैठकीसाठी कार्यकारी अभियंता कैलास ठाकरे, डेप्युटी इंजिनिअर विवेक लव्हाट, निळवंडे कालवाकृती समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर वर्पे, कार्याध्यक्ष गंगाधर गमे,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक प्रवीण शिंदे, शंकरराव चव्हाण, गंगाधर औताडे, पद्मविभूषण शरदचंद्र पवार पतसंस्थेचे संचालक बाबुराव थोरात, किसनराव पाडेकर, प्रभाकर गुंजाळ, युवराज गांगवे, आप्पासाहेब गुंजाळ, रवींद्र वर्पे, कौसर सय्यद, चंद्रकांत पाडेकर, मंगेश खंडीझोड, दत्तात्रय म्हाळसाकर, सतीश म्हाळसाकर, गजानन मते, संतोष वर्पे, गोपीनाथ राहणे, ज्ञानेश्वर गव्हाणे, अशोक गव्हाणे, रंगनाथ गव्हाणे, शिवाजी राहणे आदी उपस्थित होते.
या बैठकीत निळवंडे कालव्यांच्या कामाचा आढावा आ. काळे यांनी घेवून अधिकार्यांना बंधारे भरण्याचे नियोजन करण्यास सांगितले. त्याचबरोबर मतदार संघातील सर्व पोट चार्यांचा सर्व्हे पूर्ण झालेला आहे. त्यामुळे सर्व्हेप्रमाणे सर्व चार्यांची डिझाईनची कामे तातडीने पूर्ण करून लवकरात लवकर चार्यांच्या कामाच्या निविदा प्रसिद्ध कराव्यात.
हे ही वाचा :