अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : पावसाने दडी मारल्याने शेतकर्यांसह सर्व चिंताग्रस्त आहेत. आज सायंकाळी शहरात मान्सूनच्या हलक्या सरी बरसल्या. त्यामुळे शहरात सखल भागात पाणी साचले होते. मान्सून पूर्व व मोसमी पावसाने गेल्या काही दिवसांपासून दडी मारली आहेत.
रोहिणी, मृग नक्षत्र कोरडे गेल्याने शेतकर्यांसह सर्वच हवालदिल झाले होते. तळ कोकणात मान्सूनच्या सरी बरसल्या असल्या तरी राज्यात इतरत्र कोठे पाऊस नव्हता. येत्या दोन दिवसांत सर्व पाऊस होईल, असे अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. आज सायंकाळी शहरात पावसाच्या हलक्या सरी बसरल्या. त्यामुळे माणिक चौक परिसरात रस्त्यावर पाणी साचले होते.
हेही वाचा