कोळपेवाडी : दुष्काळामुळे राष्ट्रवादीचा दहीहंडी उत्सव रद्द : आमदार आशुतोष काळे

कोळपेवाडी : दुष्काळामुळे राष्ट्रवादीचा दहीहंडी उत्सव रद्द : आमदार आशुतोष काळे
Published on
Updated on

कोळपेवाडी; पुढारी वृत्तसेवा : कोपरगाव शहरात राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळा अर्थात दहीहंडी उत्सव साजरा करण्यात येतो. परंतु यावर्षी दुष्काळाची परिस्थिती असल्यामुळे दहीहंडी उत्सव दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आला असल्यांची माहिती आ. आशुतोष काळे यांनी दिली. कोपरगाव विधानसभा मतदार संघाकडे पावसाने पाठ फिरविल्यामुळे मतदार संघात दुष्काळाची परिस्थिती आहे. शेतकर्‍यांनी उसनवार व कर्ज काढून खरीप हंगामाची पिके उभी केली होती.

परंतु जवळपास दिड महिन्यापासून पाऊस पडला नसल्यांमुळे संपूर्ण खरीप हंगामातील पिके जळून गेली आहेत. शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होवून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. सण, उत्सव साजरे करण्यामागे परंपरा व संस्कृती आहे. त्यामुळे आजही मोबाइलच्या काळात सण-उत्सवांचे महत्त्व कमी झालेले नाही. सण उत्सवाच्या परंपरा जपण्याचाच एक भाग म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने दरवर्षी कोपरगाव शहरात दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा केला जातो.

परंतु यावर्षी दुष्काळाच्या सावटामुळे शेतकरी व सर्वसामान्य नागरिक अडचणीत असून त्याचा परिणाम शहरासह मतदार संघातील बाजारपेठेवर झाला. शेतकरी, सर्वसामान्य नागरिकांबरोबरच व्यापारी वर्ग देखील अडचणीत सापडला आहे. अशा परिस्थितीत कोणताही उत्सव साजरा करणे योग्य नाही. त्यामुळे दहीहंडी उत्सव रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. दहीहंडी उत्सव रद्द केल्यामुळे गोविदांची काहीशी निराशा होणार आहे. परंतु अशा दुष्काळाच्या व अडचणींच्या परिस्थितीत शेतकरी, व्यापारी वर्ग व सर्वसामान्य जनतेचा विचार करून यावर्षीचा श्रीकृष्ण जन्मसोहळा अर्थात दहीहंडी उत्सव रद्द करण्यात आला असे आ. आशुतोष काळे यांनी सांगितले.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news