नगर : पुढारी वृत्तसेवा : शाळेच्या आवारातील गुटख्याची टपरी हटविण्यासंदर्भात तक्रार केल्याच्या रागातून मुख्याध्यापक हेरंब कुलकर्णी यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला. हल्ल्यानंतर सोमवारी पहिल्यांदा कुलकर्णी शाळेत दाखल झाले. त्यावेळी विद्यार्थिनी औक्षण करून स्वागत करीत आनंद व्यक्त केला. यावेळी शाळेचे चेअरमन मकरंद खेर, शाळेच्या निवृत्त मुख्याध्यापिका बोगावत मॅडम, निवृत्त मुख्याध्यापक विलास साठे, भंडारी उपस्थित होत्या.
याप्रसंगी हेरंब कुलकर्णी यांनी कठीण प्रसंगात विद्यार्थी व शिक्षकांनी धैर्य दाखवले त्याबद्दल सर्वांचे कौतुक केले. महाराष्ट्रातील माध्यमे, सामाजिक संस्था, कार्यकर्ते मुख्याध्यापक हेरंब कुलकर्णी यांच्या पाठीशी उभे राहिल्या याबद्दल सर्वांनी आभार व्यक्त केले.
शाळेला वेढलेले अवैध धंदे रोखण्यासाठी इथून पुढे ही आक्रमक भूमिका घेतली जाईल. घडला प्रसंग दुःस्वप्न होते असे म्हणून विसरून जाऊ. शाळेत पुन्हा नव्याने उपक्रम राबवू, असे आवाहन हेरंब कुलकर्णी यांनी केले.
हे ही वाचा :