संगमनेर : पुढारी वृत्तसेवा : पत्नीशी अनैतिक संबंध असल्याचा संशय आल्याने जावयाने आणि त्याच्या साथीदाराने सासऱ्याचा खून केल्याची घटना घडली आहे. साकुर जवळील माळवाडी येथे एका नातेवाईकाच्या लग्नातील वरातीसाठी सासऱ्याला बोलावून घेत त्याचा तेथेच धारदार शस्त्राने गळ्यावर जखमा करत त्याचा गळा आवळून खून केला. खुनाचा पुरावा नष्ट करण्यासाठी रणखांब येथील वनविभागाच्या जंगलात नेऊन चेहरा ज्वलनशील पदार्थ टाकून अर्धवट जाळला असल्याचे पोलीसांच्या तपासामध्ये उघड झाले आहे. अवघ्या दोनच दिवसामध्ये मयताची ओळख पटविण्यात व मारेकऱ्यांना अटक करण्यात यश आले. या कामगिरीसाठी घारगाव पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील रणखांब शिवारातील वनविभागाच्या जंगलात अर्धवट जळालेला मृतदेह आढळून आला . त्यानंतर संगमनेर उपविभागाचे पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे, घारगावचे पो नि संतोष खेडकर प्रमोद गाडेकर व सुभाष बोडके यांनी मयताची ओळख पटविली. गोरख दशरथ बर्डे (वय५३रा मिरपूर, लोहारे) असे मयताचे नाव आहे. दिनेश शिवाजी पवार (रा वडगाव कांदळी ,ता जुन्नर जि पुणे) आणि विलास पवार (रा पेमदरा, ता जुन्नर जि पुणे) असे खून करणाऱ्या मारेकऱ्यांची नावे आहेत. विलास यांच्या पत्नी विमल विलास पवार असे मयत गोरख बर्डे यांच्या प्रेयसीचे नाव आहे. या तिघांनाही घारगाव पोलिसांनी अटक केली आहे.
हेही वाचा :