

राहुरी : पुढारी वृत्तसेवा
श्रीरामपूर व राहात्याच्या धर्तीवर राहुरी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीने खुला कांदा खरेदी विक्री लिलाव सुरू करावा, अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष अप्पासाहेब ढूस यांनी सहा. निबंधक दीपक नागरगोजे यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
शेतकर्यांनी ट्रॉली, टेम्पोच्या माध्यमातून खुला कांदा बाजारात विक्री केल्यास शेतकर्यांना येणारा रिकाम्या गोणीचा खर्च, मजुरी, हमाली इत्यादी सर्व खर्च सोसावा लागतो. राज्यात कांद्याचे भाव कमी झालेले आहेत. त्यातच हा खर्च शेतकर्यांना परवडणारा नाही. कांदा उत्पादन खर्चात कपात करायची असेल, तर विक्री पद्धतही बदलावी लागणार आहे. त्यामुळे गोण्यांचा खर्च वाचला, तर शेतकर्यांना दिलासा मिळणार आहे.
श्रीरामपूर व राहाता बाजार समितीने खुला कांदा खरेदी करण्याबाबत घेतलेल्या निर्णयाच्या धर्तीवर राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये खुला कांदा खरेदी विक्री व्यवहार तत्काळ सुरू करावेत, असे निवेदनात ढूस म्हणाले आहे. राजमंत्री बच्चू कडू व जिल्हाधिकारी यांना निवेदन पाठविले आहे.