नगर : पुढारी वृत्तसेवा
जून आणि सप्टेंबर हा सर्वाधिक पावसाचा कालावधी संपल्यानंतर ऑक्टोबर महिन्यात जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मात्र, ऑक्टोबर महिन्यात होणारी परतीच्या पावसाची बरसात पाहता जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीचा कार्यक्रम बिघडविण्याची शक्यता आहे. ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांचा कालावधी संपला आहे. त्या संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम तत्काळ जाहीर करा, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या प्रभागरचनेचा कार्यक्रम सुरू केला आहे.